आता रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यांतर्गत कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे होणार शक्य.

ज्या तालुक्यात मालमत्ता असेल, त्याच तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत अथवा दस्त नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र आता जिल्ह्याच्या अंतर्गत कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात ही नोंदणी शक्य झाली आहे. १ मे पासून नवी सुविधा राज्य सरकारने सुरू केली आहे.यापूर्वी ज्या तालुक्यात जमीनजुमला अथवा रहिवासी घर किंवा भविष्यात होणार्‍या अपार्टमेंटमध्ये फ्लॅटची खरेदी-विक्री असेल तर संबंधित तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी आवश्यक होती.

आता १ मे पासून या प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. रत्नागिरीचे सहजिल्हा मुद्रांक अधिकारी घार्गे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या अंतर्गत कोणत्याही दुय्यम निबंधकाकडे दस्त नोंदणी १ मे पासून सुरू झाली आहे. या सुविधेचा लाभ लोकांनी घ्यावा. गुहागरातल्या दुय्यम निबंधक कार्यालय दापोलीतील मालमत्तेचा दस्तऐवज नोंदवला जावू शकतो. राज्य सरकारने ठरवले आहे की, राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात राज्यांतर्गत असलेल्या कोणत्याही मालमत्तेचा दस्त नोंदवला गेला पाहिजे. या धोरणाचा एक टप्पा म्हणून जिल्हांतर्गत दस्त नोंदणीची मुभा उपलब्ध करून देण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button