आरजीपीपीएलने स्थानिक वाहन ठेकेदारांच्या बिलाची रक्कम अडवली.

गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात वाहनांच्या ठेक्यांचे तीन महिन्यांची रक्कम दिलेली नाही. यामुळे या वाहनांवरील चालकांचा चार महिने पगार झालेला नाही. कंपनीमधील आरजीपीपीएल कंपनीचे अधिकारी आणि कंपनी चालवणार्‍या एनटीपीसीचे अधिकारी यांच्यातील सुप्त संघर्ष या परिस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा कंपनीत सुरू आहे.रत्नागिरी वीज प्रकल्पातील विविध आस्थापनांमधील अधिकार्‍यांसाठी १५ वाहने ठेकेदारी पद्धतीने घेण्यात आली आहेत.

यामधील काही वाहने चौवीस तासांसाठी कंपनीत असतात. त्यामुळे चालकांची संख्या २४ आहे. हातावर पोट असलेल्या या चालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या चालकांनी मागील आठवड्यात एकत्र येत पगार न दिल्यास कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठेकेदारांना दिला. मात्र ठेकेदारांची धावपळ सुरू झाली. त्यांनी वाहन ठेक्याची ४ महिन्यांपासून थकित रक्कम तसेच अनामत आदी अन्य देणी त्वरित देण्याची विनंती केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button