भारताचा पाकिस्तानवर मोठा हल्ला, थेट पाकिस्तान मध्ये घुसला; पाकिस्तान आर्मीच्या हेडक्वार्टरवर भीषण हल्ला


भारताने पाकिस्तानमध्ये 9 ठिकाणी हवाई हल्ला करून अनेक दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. मात्र त्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे.भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी त्याने मिसाईल हल्ले करण्याचे प्रयत्न केले. ते आपण हाणून पडले. मात्र आता भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. भारताने पाकिस्तानच्या आर्मी हेडक्वार्टरवर भीषण हल्ला केला आहे.

पाकिस्तानने भारताच्या हवाई हल्ल्याला उत्तर देण्यासाठी केलेल्या हा प्रयत्न त्यांच्यावरक उलटला आहे. पाकिस्तानमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले आहे. एअरस्पेस बंद करण्यात आले आहे. अखनूर सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानचा लढाऊ पायलटला ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या सियाणी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ देखील हल्ला झाला आहे. भारताने आयएनएस विक्रांत देखील या लढाईत सहभागी झाली आहे. कराची बंदरावर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर अशा महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ऑल आउट वॉरची घोषणा केली आहे.पाकिस्तानने मिसाईल डागून जम्मू काश्मीर एअरबेस, पोखरण, अशा भारतीय सैन्य दलांच्या मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एस- 400 या यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले हवेतल्या हवेतच परतवून लावले. मात्र त्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button