
ठाकरे शिवसेनेतर्फे रत्नागिरी नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांची सदिच्छा भेटपावसाळ्यापूर्वीची विविध कामे अजूनही प्रलंबित असल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी केली चर्चा
रत्नागिरी : नगर पालिकेचे नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (२८ एप्रिल) भेट घेतली. यावेळी श्री. गारवे यांचे पक्षाच्या वतीने स्वागत करतानाच या भेटी दरम्यान शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.मे महिना आला तरीसुद्धा शहरातील पावसापूर्वीची कामे अजूनही प्रलंबित असल्याचे यावेळी मुख्याधिकारी श्री. गारवे यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील वाहळांची तसेच गटारांची साफसफाई अद्यापही सुरू झाली नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची पाईप लाइन या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख सलील डाफळे, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, संदेश भिसे, शकील मालदार, साजिद पावसकर, राजाराम राहटे, युवा सेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, महिला उपशहरप्रमुख, विजया घुडे, उन्नती कोळेकर, महिला विभागप्रमुख पूजा जाधव, रूपाली तवसाळकर राजश्री लोटणकर, प्रवीण शिवलकर, बिपीन शिवलकर, बाबू बंदरकर तुषार कांबळे उपस्थित होते.