वाशी येथील फळबाजारात कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळबाजारात कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. दर दिवशी सलग १० लाखाहून अधिक किलो आंबा फळबाजारात ३ दिवसांपेक्षा सातत्याने येत आहे. पुढच्या काळात आवक वाढेल, असा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला.गेल्या ३ दिवसाहून अधिक काळ मुंबईच्या फळबाजारात १० लाखाहून अधिक किलो आंबा दाखल होत आहे.

सध्या कोकणातून त्याचा भाव सरासरी ४५ हजार रुपये प्रतिक्विंटल असा नोंदवला गेला आहे. कोकणाशिवाय अन्य ठिकाणाहून ६ हजार ६४५ क्विंटल आंबा दाखल झाला. देवगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला शिवाय मद्रास आंब्याची आवक लक्षणीय होती. बदामी आंबा आपला भाव टिकवून आहे. निलम आंबाही काही प्रमाणात बाजारात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button