वनखात्याच्या रत्नागिरी वनपरिक्षेत्रात २०० वानर, माकडे पिंजराबंद करण्याची यशस्वी मोहीम.

आता हापूस आंबा, काजू हंगामाला प्रारंभ झालेला असून या फळबागायती आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वानर, माकडांचा उपद्रव ठरणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमणात फळधारणा होण्याअगोदरच्या हंगामात माकड पकड मोहीम गतीमान होण्याची अपेक्षा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. वनविभागाच्या राजापूर, लांजा, संगमेश्‍वर, पाली या परिक्षेत्रात १५ ऑक्टोबर ते आतापर्यंत सुमारे २०० हून अधिक वानर माकडांना पिंजराबंद करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.मात्र गेली काही वर्षे फळबागा व शेतीपिकांचे माकडांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यातील शेती बागायतीला उपद्रवी ठरत असलेल्या वानर, माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी गेल्या १५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा माकड, वानर पकडण्याची मोहीम वनविभागाकडून हाती घेण्यात आली. त्यासाठी वनविभागाकडून ३० लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर झाला आहे. या मोहिमेसाठी माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांच्या पुढाकाराने हा निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button