
रत्नागिरी शहरवासियांना पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणाच्या बाजूने खचणार्या डोंगराला संरक्षक भिंत
रत्नागिरी शहरवासियांना पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणाच्या सांडव्याकडील बाजूला असलेल्या डोंगराला २ वर्षापूर्वी अतिवृष्टीत मोठ्या भेगा जावून मोठ्या प्रमाणात भाग खचला होता. त्यामुळे धरणाला काही अंशी निर्माण झालेला धोका लक्षात घेत खचणार्याा डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत उभारणीसाठी १४ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्या मंजूर झालेल्या संरक्षक भिंतीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.www.konkantoday.com