तुम्ही साधी लोकांची चुल पेटवू शकत नाही तर महाराष्ट्र काय पेटवणार ? -माजी आमदार प्रमोद जठार

बारसु नको तर आम्हाला नाणार द्या… तुम्हाला बारसु नको असेल तर आमच्याकडे नाणार आहे, नाणार मध्ये १० हजार एकर जमिनीची सम्मतीपत्र आहेत.त्यामुळे रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.

दरम्यानच, आज रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची संवाद साधताना आक्रमक पवित्रा घेत जर रिफायनरी रद्द झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र पेटवू असा इशारा दिला. ठाकरेंच्या या इशाऱ्याचा प्रमोद जठार यांनी बोचऱ्या शब्दात समाचार घेतला. तुम्ही साधी लोकांची चुल पेटवू शकत नाही तर महाराष्ट्र काय पेटवणार ? अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अडीच वेळाही मंत्रालयात गेला नाहीत. मग तुम्ही महाराष्ट्र काय पेटवणार ? असा प्रश्न देखील केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button