कोकण काय नारायण राणेंच्या बापाचं आहे का? येथे पाय ठेऊन देणार नाही, तिथे पाय ठेऊ देणार नाही- खासदार संजय राऊत
राजापूर तालुक्यातील बारसू येथे आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू आहे. पण, याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे लवकरच बारसू येथे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं. आम्ही आहोत, बघूया काय होतं, ते,” असं नारायण राणेंची म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.कोकणात येण्याची तारीख जाहीर करावी. आम्ही पण येतो, तिकडे बघूया. होऊन जाऊदे एकदाचं. कोकणातून मुंबई पळून जाण्यासाठी किती किलोमीटर लागेल. चालण्याची ताकद नसणाऱ्यांनी पळण्याचा विचार सुद्धा करू नये,” असा हल्लाबोल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कोकण काय नारायण राणेंच्या बापाचं आहे का? येथे पाय ठेऊन देणार नाही, तिथे पाय ठेऊ देणार नाही. तुमचे पाय कुठेयात ते पाहा. काय आणि कोणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात. पाय ठेऊन देणार नाही म्हणजे, कोणाची दलाली करत आहात. कोकणात एकदा नाही दोनदा आपण पराभूत झाला आहात. केंद्रीय मंत्री आहात प्रतिष्ठेने राहा. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका,” अशा शब्दांत संजय राऊतांनी नारायण राणेंना खडसावलं आहे.
www.konkantoday.com