मागण्या मान्य करा… अन्यथा आंदोलन करण्याचा कोतवालांचा इशारा

राजापूर : राज्याच्या महसूल प्रशासनात सेवा देणार्‍या कोतवाल संवर्गाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित राहिलेल्या आहेत. या मागण्यांच्या मंजुरीसाठी वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रलंबित मागण्यांना शासनाने तातडीने मंजुरी देऊन न्याय द्यावा, अन्यथा बुधवारी (ता.28) विधान भवनावर धडक देण्यात येईल, असा इशारा कोतवाल संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा कोतवाल संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. संघटनेचे पदाधिकारी शेखर सावंत, विक्रांत कदम, शशिकांत सनगरे, सुशिल दुर्गवली, सूरज कांबळे आदींनी दिले. त्यामध्ये कोतवाल संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात येणार्‍या धडक मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटना सहभागी होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button