केवळ एकतर्फी दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा सिग्नल यंत्रणा सुरू करा पार्किंगसाठी जागा आधी खुल्या करा

एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई सुरू आहे. परंतु दुसरीकडे या शिस्तीसाठी आवश्यक असलेली सिग्नल यंत्रणा गेली कित्येक वर्षे बंद आहे. पार्किंगचे अनेक प्लॉट आरक्षित आहेत. मात्र त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे नो पार्किंगची कारवाई होते, परंतु पार्किंगसाठी कुठे जागा आहे, हे दाखविणारी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा पोलिसांना कारवाईतच रस असल्याने मुख्य उद्देश बाजूला राहून शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
शहरातील वाहतूक कोंडीवर सिग्नल यंत्रणा हा चांगला पर्याय होता. परंतु पालिकेमार्फत बसविण्यात येणारी ही यंत्रणा अतिशय तकलादू ठरली.
मारूती मंदिर, जेल नाका, राम आळी, गोखले नाका, राणी लक्ष्मीबाई चौक या ठिकाणी ही सिग्नल यंत्रणा आहे. गेल्या काही वर्षामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तीन ते चार वेळा सिग्नल दुरूस्त करण्यात आले परंतु ते काही दिवसात पुन्हा बंद पडले. लाल सिग्नल लागून राहणे, टाईम संपले तरी निळा सिग्नल न लागणे, डाव्या-उजव्या बाजूचे सिग्नल लागून राहणे अशा अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे ही सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली. ती दोन ते अडीच वर्षे झालेली नाहीत. त्यामुळे कोणताही रस्ता ओलांडताना वाहनधारक बिनदिक्कत रस्ता ओलांडत आहेत. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button