शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन

देवरुख: 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावविकास समिती, रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्यावतीने 20 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना या निर्णयामुळे सर्वाधिक फटका हा कोकणातील मराठी शाळांना बसणार आहे. दुर्गम भागात वाडी वस्त्यांवर राहणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते. शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थी हित लक्षात घ्यावे, अशी भूमिका घेऊन या निर्णयामुळे होणार्‍या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  दि. 20 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे हे धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती गावविकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काबदुले यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button