मशाल निशाणी मिळाल्यानंतर रत्नागिरीत जल्लोष

रत्नागिरी : मशाल ही निशाणी मिळाल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.  मंगळवारी रत्नागिरीत याबाबतचे फलक लावण्यात आले. नवीन नाव आणि नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रत्नागिरीतील शिवसैनिक सज्ज झाले आहेत. साळवीस्टॉप येथे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी घोषणा देत जल्लोष केला. मशाल ही शिवसेनेची महत्त्वाची निशाणी आहे. बाळासाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठला आहे, गद्दारांनी आता स्वतःचा विचार करावा, अशा प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. यावेळी विधानसभा संघटक प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शेखर घोसाळे, युवासेना तालुकाधिकारी प्रसाद सावंत यांच्यासह महिला वर्गही मोठ्यासंख्येने उपस्थित होता.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button