रत्नागिरीत मुले पळवणार्‍या टोळीबाबत अफवा

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाजमाध्यमांव्दारे शालेय मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याची छायाचित्रे, बातम्या, व्हीडिओ, ऑडिओ क्‍लिप काही लोकांकडून व्हायरल होताना दिसून येत आहेत. मात्र, जिल्ह्यात अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा कोणत्याही टोळ्या सक्रीय व दाखल झाल्याबाबतची तक्रार झालेली नाही. त्यामुळे खात्री झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ, ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्यास त्याला समाजमाध्यमांव्दारे अथवा नागरिकांकडून दुजोरा देण्यात येऊ नये. तसेच याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्यास नागरिकांनी रत्नागिरी पोलिस कंट्रोल रूम दुरध्वनी क्र. (02352-222222) तसेच अतितत्काळ हेल्पलाईन डायल-112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button