शहरातील क्रांतीनगर येथे तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दिनांक ६ जून रोजी तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीसांना आज मंगळवारी तिघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे .अटक केलेल्या तिनही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत.
रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दि. ६ जून रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र शिवाजी विटकर या तरुणावर दोघांनी तलवारीने वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा भाऊ रविंद्र शिवाजी विटकर यांने शहर पोलीस स्थानकात गुरुनाथ उर्फ गोट्या नाचणकर याच्यासह दोघांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरुन रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे गुरुनाथ नाचणकर याच्यासह त्याच्या साथिदारावर गु.र.नं.231/2022 भादंवि कलम 307, 34 , भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल केला होता.
मा.पोलीस अधीक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग यांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती व त्यांना आरोपी अटकेबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस पथक आरोपी गुरुनाथ नाचणकरसह त्याच्या साथिदाराचा शोध घेत असतानाच मंगळवारी सकाळी गुरुनाथ नाचणकर हा आपल्या साथिदारासह माळनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी माळनाका परिसरात शहर पोलीसांचे पथक सापळा लावून होते. याच वेळी गुरुनाथ नाचणकर आपल्या साथिदारासह माळनाका येथे आला असता पोलीस पथकाने त्या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर, गुरुनाथ नाचणकर हा गुन्हा घडल्यानंतर सौरभ अर्जून सावंत (रा. सुपलवाडी , नाचणे ) याच्याकडे आश्रयाला असल्याचे पुढे आले. गुरुनाथ व त्याच्या साथिदाराने गंभीर गुन्हा केला आहे व पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, हे माहित असताना सुद्धा गुन्हेगाराला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली सौरभ सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ .मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई , उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे , अंमलदार प्रविण बर्गे, आशिष भालेकर, गणेश सावंत, नंदू सावंत, वैभव नार्वेकर, प्रविण पाटील, अमोल भोसले,विलास जाधव, राहुल घोरपडे, अमित पालवे, निलेश कांबळे , उदय वाजे, कामेरकर, देवसकर यांनी ही कामगिरी केली.
गंभीर गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करणा-या पोलीस पथकाचे मा. पोलीस अधीक्षक डॉ .मोहितकुमार गर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button