परतीचा हंगामासाठी सुद्धा एसटी सज्ज ,परतीसाठी सुद्धा एसटीच्या 2200 बसेस सज्ज
एसटी महामंडळाने मुंबई विभागातून गौरी, गणपतीसाठी कोकणात जाण्या येण्यासाठी तब्बल 4400 बसेसचे नियोजन केले असून, जाण्याचा हंगाम संपताच आता मंगळवार पासून परतीचा हंगामासाठी सुद्धा एसटी सज्ज झाली आहे.परतीसाठी सुद्धा एसटीने 2200 बसेस सज्ज ठेवले असून, रविवार पर्यंत 1500 बसेसचे ग्रुप, नॉर्मल बुकिंग झाले असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.आता मंगळवारी चाकरमानी दोन आणि पाच दिवसांचा गणपती उत्सव साजरा करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतणार आहे. मंगळवार पर्यंत एसटीचे बुकिंग वाढण्याची शक्यता सुद्धा एसटीने वर्तविली आहे. यामध्ये प्रवाशांच्या वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण उद्भवल्यास 1800221250 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com