महापुरातील गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरणासह संभाव्य रोगराई प्रतिबंधक जंतुनाशक फवारणी करण्याची समविचारीची मागणी
महापुरात सापडलेल्या चिपळूण खेडसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी सर्वप्रथम शंभर टक्के लसीकरणावर भर देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा कार्यक्रम कामकाज आढावा बैठकीत सर्वस्वी बाबा ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,युवा अध्यक्ष निलेश आखाडे,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,कोकण विभाग युवाध्यक्ष राजाराम गावडे,युवा जिल्हाधिकारी रिकी नाईक, संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव आदींच्या उपस्थितीत हा निर्णय करण्यात आला. गेले महिनाभर चिपळूणात डेग्युच्या साथीने अनेकांना फटका बसला.त्यात हे संकट आले.तेव्हा जिल्ह्यातील जिथे जिथे पुरजन्य परिस्थिती उद्भभवली त्या त्या ठिकाणी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के करावे.तसेच पूर आलेल्या ठिकाणी चिखलासह घाणीचे साम्राज्यही पसरलेले आहे.तेव्हा संभाव्य रोगराई प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुरग्रस्त भागातील सर्व ठिकाणी त्वरित जंतुनाशक फवारणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी करण्याचेही ठरविण्यात आले. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली.आता प्रत्यक्ष आंदोलन उभारावे.त्याशिवाय यंत्रणांना जाग येणार नाही.रत्नागिरी बसस्थानकाचे कित्येक महिने रेंगाळलेले बांधकाम आणि गणेशोत्सवापूर्वी शहरातील जागोजागी पडलेले खड्डे सुधारण्यात यावेत यासाठी लवकरच आंदोलन करण्यात यावे असेही यावेळी ठरविण्यात आले.
www.konkantoday.com