केंद्रात जिल्ह्यातील मंत्री आहेत तेव्हा लसीचा पुरवठा वाढेल -पालकमंत्री उदय सामंत यांचा टाेला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
यापुढे लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून केंद्राकडून लसीचा पुरवठा किती होतो त्यावर लसीकरणाचा वेग अवलंबून राहणार आहे.
केंद्रात जिल्ह्यातील मंत्री आहेत तेव्हा लसीचा पुरवठा वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांचे नाव न घेता लगावला.
www.konkantoday.com