
सरकारची प्रशासकीय बदल्यांना केवळ १४ ऑगस्टपर्यंत परवानगी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी कोरोना संसर्ग कायम आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने प्रशासकीय बदल्यांना केवळ १४ ऑगस्टपर्यंत परवानगी दिलीय. मात्र, १४ ऑगस्टनंतर कोणत्याही बदल्या करता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. या आदेशात १४ ऑगस्टपर्यंत केवळ विहित कालावधी पूर्ण झालेल्या १५ टक्के मर्यादित सर्वसाधारण बदल्या करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत
www.konkantoday.com