पुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती

रत्नागिरी दि. 11: भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. 14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्‍यात आलेली आहे तसेच 16 मे 2021 रोजी महाराष्ट्र -गोवा किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात येत असून 15 मे व 16 मे 2021 या कालावधीत संबधितांना समुद्रात जाऊ नये असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button