मराठा समाजाची मुलं वेगवेगळ्या विभागात सिलेक्शन होऊन २ वर्षा पासून घरी बसली आहेत त्यांना तरी न्याय द्या-माजी खासदार निलेश राणे
उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त बोलून साखर कारखान्यांच्या कामाला लागले. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कसा निर्णय घ्यायचा असतो हे राज्य सरकारलाच कळत नाही आहे. कमीत कमी जी २१८५ मराठा समाजाची मुलं वेगवेगळ्या विभागात सिलेक्शन होऊन २ वर्षा पासून घरी बसली आहेत त्यांना तरी न्याय द्या. असा घणाघात भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार आणि मराठा आरक्षण एल्गार सभेचे प्रणेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर केला आहे.
www.konkantoday.com