चाकरमान्यांनाे कोकणात येणार असाल तर तुमची करोना टेस्ट होणार
रत्नागिरी जिल्ह्यात कराेना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे राज्या प्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक कोकणवासीय परत आपल्या गावाकडे येत आहेत यामुळे आता प्रशासनानेदेखील कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांची देखील तपासणी करून कोराेना टेस्ट घेण्यात येणार आहे तसेच अनेक जण मोठ्या प्रमाणावर खासगी गाड्या घेऊन कोकणात दाखल होत असल्याने आता प्रशासनाने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर तपासणी केंद्रे सुरू केली आहेत मुंबईतून येणारे चाकरमानी कशेडी घाटामधून जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याने त्या ठिकाणीदेखील कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत खेडच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कशेडी घाटात गाड्याची व येणार्या लोकांची कडक तपासणी केली जात आहे
www.konkantoday.com