रत्नागिरी व्यापारी महासंघाचे बंदला विरोध करणारे बॅनर पुन्हा जागेवर झळकू लागले , लोकशाहीचा विजय की खास आदेशाचा परिणाम?

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने नव्याने आलेल्या निर्बंधांमुळे
अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते त्याला शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला होता रत्नागिरी व्यापारी महासंघाच्यावतीने या बंदीला असलेल्या विरोधाबाबत दोन बॅनर शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी लागते हे बॅनर रत्नागिरी नगरपरिषदेने काढून टाकले होते त्यामुळे व्यापार्यांच्यात संताप उसळला होता परंतु कालपासून या दोन ठिकाणी हे बॅनर परत एकदा झळकू लागले आहे नगरपरिषदेने काढून टाकलेल्या ठिकाणीच हे बॅनर परत लावले असल्याने हा लोकशाहीचा विजय झाला आहे की बॅनर काढून टाकलेल्या संबंधित यंत्रणेला खास आदेश आल्याने ही चूक सुधारून परत बॅनर लावण्यास परवानगी देण्यात आली याबाबत शहरात चर्चा सुरू आहे हे बॅनर लावण्यास परवानगी मिळाल्या बाबत व्यापारी महासंघानेही कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही मात्र हे बॅनर सध्या तरी झळकू लागले आहेत उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे आज रत्नागिरीच्या दौर्‍यावर येत आहेत त्या पाश्र्वभूमीवर या घडामोडी घडल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button