राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची रामदास आठवले यांची मागणी
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज हजारोच्या संख्येने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
www.konkantoday.com