सांगलीतील फळ व भाजीपाला मार्केटमध्ये देवगड व रत्नागिरी हापूस आब्यांची आवक
सांगलीतील फळ व भाजीपाला मार्केटमध्ये देवगड व रत्नागिरी हापूस आब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
मार्च अखेर एप्रिलपासून सुरू होणारा हंगाम यंदा दीड ते दोन महिना लवकर सुरू झालेला आहे. दरातील तेजीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून लवकर आंबा बाजारात आणला आहे. कोरोनामुळे सध्या उठाव कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात १०००हजार पेटी आंबा दाखल झाला आहे. देवगड हापुस एक डझनाचा दर किमान ५००, कमाल १६०० रुपये सरासरी एक हजार रुपये तर रत्नागिरी हापुस चार ते पाच डझन पेटीचा दर किमान ३०००, कमाल ५००० रुपये सरासरी दर चार हजार रुपये आहे.
www.konkantoday.com