
महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याच्या सूचना – ना.उदय सामंत
करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. अशा स्थितीत महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात करोना रुग्ण वाढत चालले आहेत. याची जाणीव राज्य शासनाला झाली आहे. त्यासाठी शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्याला दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार तत्पर झाले आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com