अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही,कणकवलीच्या दादागिरीचे दिवस आता संपले -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत

स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी जुना, नवा वाद काढून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेले अनेक वर्ष यांची गोळप ग्रामपंचायतीवर मक्तेदारी होती. आता कणकवलीचे समर्थन घेवून दादागिरी करायची असेल तर ती खपवून घेणार नाही. कणकवलीच्या दादागिरीचे दिवस आता संपले आहेत. आम्ही सुसंस्कारित आहोत, परंतु अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी गोळप येथील जाहीर सभेत दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button