रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात काल व आज अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर दापोली चिपळूण तालुक्यात अवकाळी पाऊस झाला.जिल्ह्याच्या अनेक भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते चिपळूण शहरातही आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर रत्नागिरी शहरातही काही भागात आज सकाळी पाऊस शितंडला मात्र सध्या तरी वातावरण ढगाळच आहे दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंबा उत्पादनात तब्बल ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. उशिरानं आलेला मोहोर, रोगांचा सामना यावर्षी मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button