महाराष्ट्रातील रस्त्यांच्या ५ हजार ५०० कोटींच्या कामांना मंजुरी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत,यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या ५ हजार ५०० कोटींच्या कामांना मंजुरी दिल्याचे ते यावेळी म्हणाले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button