
काही मंडळींनी राजकारण करण्यासाठी मुंबई पोलिसांना बदनाम केले-गृहमंत्री अनिल देशमुख
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. एम्सने सुशांतसिंहच्या व्हिसेरामध्ये विषाचा अंश नसल्याचं सांगतिल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यात अनिल देशमुख म्हणाले, मुंबई पोलिसांनी देखील आपला तपास या योग्य दिशेने केला होता. हे यावरून स्पष्ट होत आहे. मात्र राजकीय पक्षांतील काही मंडळींनी राजकारण करण्यासाठी मुंबई पोलिसांना बदनाम केले.
ज्यांच्या हातात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मागील ५ वर्ष होते, त्यांनी देखील महाराष्ट्राला आणि पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्राच्या जनतेला आता स्पष्ट झालं आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
www.konkantoday.com