रत्नागिरीतील रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर धाव घ्यावी लागते हे दुर्दैव

कोरोनाच्या काळात चांगली कामगिरी बजावणारे डॉ. दिलीप मोरे यांचे शेवटी कोरोनाने दुर्देवी निधन झाले डॉ. दिलीप मोरे यांनी केलेल्या कामाची दखल म्हणून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी शासकीय रूग्णालयातील एका वॉर्डाला डॉ. मोरे यांचे नाव देण्याचे जाहीर केले. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतल्यासारखी आहे. मात्र असे असले तरी रत्नागिरीच्या आरोग्य यंत्रणेची परिस्थिती यातून लपू शकणार नाही. गेली कित्येक वर्षे रत्नागिरीतील रूग्णांना ऐनवेळी कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे अनेक रुग्ण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. रत्नागिरी अद्यावत सुविधा असणारे एकही मोठे रूग्णालय नाही. जिल्ह्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी या कामी पुढे येवून जिल्ह्यात एखाद्या चांगल्या ट्रस्टच्या मदतीने अद्यावत रूग्णालय उभे केल्यास ते रत्नागिरीकरांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. केवळ भावनिक विचार न करता यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्ण लोकांना गंभीर स्थिती झाल्यावर कोल्हापूरला धाव घ्यायला लागू नये यासाठी सर्वांनीच पक्षभेद विसरून प्रयत्न करणे आवश्यक आहे. ना. उदय सामंत यांची मातोश्रीवर जवळीक आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत आहेत त्यांच्याकडे हक्काने कोकणासाठी एखाद्या ट्रस्टचे अद्यावत रूग्णालय करण्यासाठी मागणी करून त्याचा पाठपुरावा केल्यास या ठिकाणी अद्यावत रूग्णालय व अद्यावत उपचार रत्नागिरीकरांना मिळू शकतील व अन्य ठिकाणी धाव घेण्याची वेळ येणार नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button