संगमेश्वर तालुक्यातील निवधे गाव बावनदी पुल धोकादायक
(देवरुख)संगमेश्वर तालुक्यातील निवधे गाव बावनदी पुलाची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे.700 ते 750 लोकसंख्या असणाऱ्या निवधे गावातुन बामणोली,ओझरे,मारळ, मार्लेश्वर,अंगावली,देवरुख या ठिकाणी जाण्यासाठी मोठया प्रमाणात या पुलावरून रहदारी चालू असते गावातील लोक व मार्लेश्वर करिता चालत येणार भावीक हे या पुलाचा वापर करत असतात.पूल पंचवीस ते तीस वर्ष जुना असून तो अतिशय धोकादायक बनला आहे त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल व्हावा असे ग्रामस्थ अनेक वर्ष मागणी करत आहेत.लोकप्रतिनिधींनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे नाहीतर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.
www.konkantoday.com