
लॉकडाऊनच्या धसक्याने लोकांनी केली नियमांना फाटा देत डिमार्ट बाहेर प्रचंड गर्दी
रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलै ते ८ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केल्यापासून रत्नागिरी शहरात आज सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली असून रत्नागिरी शहरातील राम आळी, गोखले नाका, धनजी नाका आदी बाजारपेठेच्या गर्दीच्या भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोकं मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडल्याने दुकानात गर्दी उसळली होती. रत्नागिरीतील डिमार्ट देखील यातून सुटले नाही. डिमार्टच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. डिमार्टमध्ये सुरक्षा रक्षक ठराविक लोकांनाच आत सोडत असले तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. लोक दाटीदाटीने सुरक्षित अंतराचा नियम डावलून उभे होते. तर अनेकांनी मास्क घालण्याचेही टाळले होते. हा लॉकडाऊन किती दिवस चालेल या भीतीने लोकही मोठ्या प्रमाणावर अनेक दिवसांची खरेदी करून बाहेर पडत होते. त्यामुळे या परिसराला गर्दीचे स्वरूप आले होते. वास्तविक प्रशासनाने जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे जाहीर केले होते तरी देखील नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
www.konkantoday.com
