राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्यांविरूद्ध मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

ऐन पाणी टंचाईच्या काळात राजापूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची कामे अडवून ठेवून नगर परिषद प्रशासन व नागरिक यांना नाहक त्रास देणार्‍या जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश पांडकर यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी राजापूरचे नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी केली आहे. पांडकर हे ३० मे रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या एकूण कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी खलिफे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button