मराठी भाषिक राज्यात मराठीवरच अनेकदा अन्याय
मराठी राज्यभाषा असलेल्या महाराष्ट्रात अनेक वेळेला मराठीवरच अन्याय होत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध आदेश काढण्यात आले परंतु यातील बहुसंख्य आदेश हे इंग्रजी भाषेतच होते. त्यामुळे सध्या शासनाकडूनच मराठी भाषेवर अन्याय होत असल्याचे दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून जसजसे काम पूर्ण होत आहे तसे त्या ठिकाणी गावांच्या नावांचे फलक लावण्यात येत आहेत. मात्र या फलकावरील गावांची नावे मराठीत लिहिण्यात आली आहेत. त्यामध्ये असंख्य चुका झाल्या आहेत. सिंधुदुर्गात तर अनेक गावांच्या मराठीत लिहिलेल्या नावांची बारसे करण्यात आली आहेत. नुकताच याच मार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर लांजा गावाच्या नावाचे देखील मराठीतून ळांजा असे नाव लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महामार्गावरून अनेक वेळा लोकप्रतिनिधी देखील जात असून देखील यामध्ये कोणीही लक्ष देत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com