अखेर २५ विमाने मुंबईतून झेप घेणार व तेवढ्याच विमानांना उतरण्याची परवानी
देशांतर्गत विमान उड्डाणे उद्यापासून सुरू होणार आहेत. देशभरातून दररोज १०५० विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यापैकी २५ विमाने मुंबईतून झेप घेतील व तेवढ्याच विमानांना उतरण्याची परवानी देण्यात आली आहे.
केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवार (ता.२५) पासून देशांतर्गत विमानसेवा मर्यादित प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूने विरोध दर्शविला होता. पहिल्यांदा तमिळनाडूने विमान उड्डाणांची तयारी दर्शविली, त्यानंतर आता महाराष्ट्राने तयारी दर्शविली आहे. पश्चिम बंगालने मात्र थोडी मुदत मागितली आहे. देशभरातील १३ राज्यांनी यासाठीची स्वतंत्र नियमावली केली असून, त्यानुसार विमानांतून येणाऱ्या प्रवाश्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे
www.konkantoday.com