
राज्यात विमानसेवा अद्याप सुरू होणार नाही -गृहमंत्री अनिल देशमुख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारने २५ मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्यात विमानसेवेवर मात्र बंदी कायमच आहे. मुंबईतील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. अशावेळी रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणं आणखी धोक्याच ठरेल. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच!
यामुळे राज्यात विमानसेवा अद्याप सुरू होणार नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे
www.konkantoday.com