रत्नागिरी जिल्ह्यात अजून ११ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले, याआधी उपचार घेत असलेल्या एका महिलेचा आज मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथुन आता प्राप्त झालेल्या अहवालातील ११ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ९ रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.तथापी २ रुग्ण तपासणी करून आपल्या घरी गेले आहेत त्याचा तपास करण्यात येईल असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले आहे. आज एका महिला रुग्णाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेर १२४ इतकी झाली आहे.आतापर्यंत ३३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button