परदेशातून कोळसा घेऊन आलेल्या जहाजामुळे जिल्हा यंत्रणा सतर्क


सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे त्यामुळे सर्वत्र खबरदारीचे उपाय योजनेत आले आहेत रत्नागिरीतील एका कंपनीसाठी कोळसा घेऊन आलेल्या जहाजांमुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली सुरुवातीला हे जहाज चीनमधून आले असल्याचे वृत्त होते हे जहाज इंडोनेशिया सिंगापूर करून येथील
रनपार बंदरात आले आहे .या जहाजावर तेवीस कर्मचारी असून इंडोनेशिया व अन्य देशातील कर्मचारी आहेत जहाज आल्यांची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या जहाजाला भेट देऊन येथील कर्मचाऱ्यांची तपासणी केली .हे जहाज चीनमधून आलेले नाही तर इंडोनेशियामधून आले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button