भंगारवाल्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे उद्योजक संकटात भंगार टोळीवर कारवाई करा -बाबाजीराव जाधव
लोटे सारख्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना सध्या भंगार टोळी जवळ सामना करावा लागत आहे. याच भंगार टोळीच्या कृत्यामुळेच लोटे परिसरातील उद्योग आर्थिक संकटात आल्याने हे उद्योग बंद होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा पोलीस प्रशासनाने वेळीच लोटे औद्योगिक परिसरातील भंगार टोळीवर नियंत्रण आणून या भंगार टोळीच्या प्रमुखावर कठोर कारवाई करावी अन्यथा एक दिवस बेकारीमुळे येथे खून, चोर्या, दरोडेखोर गंभीर गुन्ह्याची वाढ होईल अशी भीती रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com