आरमार विजय दिन आगळ्या पद्धतीने साजरा होणार

आरमार विजय दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा तसेच हा कार्यक्रम रत्नागिरीतील सर्व ज्ञाती समाजातील व्यक्तींनी एकत्र येवून साजरा करावा या उद्देशाने रत्नागिरीत आरमार विजय दिन समिती गठीत करण्यात आली. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. १४ डिसेंबर रोजी येथे हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणार असल्याची माहिती समिती संयोजक राजीव कीर यांनी दिली.
सागर किनार्‍यांचे प्राचीन काळातील महत्व आणि राष्ट्राची सुरक्षा यांचा विचार करुन भविष्याचा वेध घेवून सागर किनार्‍यावरील व्यापार, तेथील महिलांचे सबलीकरण, दर्यावर्दी बांधवांचे एकीकरण व्हावे यासाठी सर्व १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार यांची सभा आरमार विजय दिन कार्यक्रम समितीच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी संयोजक राजीव कीर, सहसंयोजक स्वप्नील सावंत, सुधीर वासावे, रघुवीर शेलार, कॅप्टन कोमल सिंग, संतोष पावरी आदी समिती सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button