छत्रपती शिवाजी स्टेडियमचा वापर देव देवस्कीसाठी?

रत्नागिरी शहरातील नागरिकांना व तरुण मुलांच्या क्रीडा क्षेत्रातील कला गुणाना वाव मिळावा यासाठी रत्नागिरी येथे मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी नगरपालिकेने बांधले आहे याची मालकी नगरपालिकेकडे आहे मात्र दिवसेंदिवस या स्टेडियमचा वापर खेळाऐवजी अन्य गैर कामाकडेच होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत अनेक वेळा स्टेडियममध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडत आहे तर काही महिन्यापूर्वी एका छोट्या बालिकेवर अत्याचाराची ही घटना झाली होती .हा प्रकार घडल्यानंतर काही काळ चौकशीचे फार्स व सुरक्षितेच्या गोष्टी चर्चा होऊन पोकळ आश्वासने देण्यात आली परंतु आता चक्क स्टेडियमचा वापर देवदेवस्की करण्यासाठी होत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे स्टेडियमवर गेलेल्या नागरिकांना या ठिकाणी नारळ लिंबू हळद कुंकू मिरच्या असे एके ठिकाणी ठेवल्याचे आढळून आले तर काही ठिकाणी लिंबू फेकण्यात आली होती .यामुळे नागरिकांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .या ठिकाणी विविध खेळांसाठी वॉकिंगसाठी लहान मोठ्यांपासून वावर असतो .यामुळे देव देवस्की सारखे प्रकार या ठिकाणी होत असतील तर स्टेडियमची सुरक्षिताधोक्यात आली आहे हे स्टेडियम दिवसेन दिवस बदनाम होत असून निदान नगरपालिकेने याकामी तातडीने लक्ष घालून सुरक्षित उपाययोजना करणे जरुरीचे आहे .तसेच लोकप्रतिनिधी आणि जागृत नगरसेवकांनी यात तातडीने लक्ष घालणे जरुरीचे आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button