चिपळुणात १५० जणांना विंचू, ४७ जणांना सर्पदंश
परतीच्या अवकाळी पावसाने हैराण झालेले शेतकरी सध्या भातकापणीत व्यस्थ आहेत. भातकापणी करताना शेतकर्यांना विंचू आणि सर्पदंशाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत दीडशे जणांना विंचूदंश तर ४७ जणांना सर्पदंश झाला आहे. याची नोंद तालुक्यातील कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com