उदय सामंत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार-माजी आमदार बाळ माने

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि मी प्रतिस्पर्धी होतो. आम्ही आपापल्या परीने पक्ष वाढवला. राज्यात महायुती झाली असून लोकसभा निवडणुकीपासून शिवसेना व भाजपचे रत्नागिरी जिल्ह्यातील संबंध अतिशय चांगले झाले आहेत असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे .
माझ्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते उदय सामंत यांच्या विजयासाठी झटत आहेत .त्यामुळे उदय सामंत विक्रमी मताधिक्याने विजयी होवून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल. कोणाला कसे व कुठे ठेवायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. जयगड एमआयडीसी, युवकांना रोजगार, शेतकरी, मच्छिमार आदी प्रश्‍न सोडवायचे आहेत. आम्ही त्यांच्या विजयाकरिता सज्ज आहोत असेही माने यांनी सांगितले .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button