बीएसएनएल बंद करण्याचा अर्थ मंत्रालयाचा सल्ला
तोटय़ात असलेल्या सरकारी दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने दिला आहे. अर्थ मंत्रालयाकडे या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी ७४हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मागणी केली होती. मात्र अर्थ मंत्रालयाने ही मागणी फेटाळत या कंपन्यांमधील कर्मचाऱयांना सक्तीने घरी पाठविण्याचा सल्ला दिला आहे.
www.konkantoday
com