भाजपची सभा विक्रमी करूया- अॅड. विलास पाटणे
रत्नागिरी-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता रत्नागिरीत येत आहेत. प्रशासनावर पकड असलेले अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री असूून त्यांची सभा मोठ्या उपस्थितीने विक्रमी करूया, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा स्वागताध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी स्वागत समितीच्या बैठकीत केले.
हॉटेल विवेक येथे झालेल्या बैठकीत पाटणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्षम, लोकाभिमुख प्रशासन दिले. राजकीय प्रश्न, शेतकरी आंदोलन, शेतकर्यांच्या आत्महत्या, मराठा आंदोलन असे सर्व प्रश्न कार्यकुशलतेने सोडवले. याकरिता कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठबळ दिले पाहिजे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने स्वागत समिती स्थापन केली आहे.याप्रसंगी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनीही मार्गदर्शन केले. या सभेला बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक कदम, डॉ. अलिमियाँ परकार, मुन्नाशेठ सुर्वे, जयंत देसाई, अॅड. प्रदीप नेने, सीए भूषण मुळ्ये, सीए श्रीरंग वैद्य, अॅड. विजय साखळकर, प्रवीण लाड, राजन मलुष्टे, अॅड. फजल डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com