खासगी बसचालकांकडून मोठी भाडेवाढ ,स्वाभिमानची कारवाईची मागणी
गणपती उत्सवाच्या काळात काही खासगी बस ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर भाडे आकारले गेले. रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून १७००भाडे घेतले गेले.परिवहन खात्याने दिलेल्या आदेशा प्रमाणे या काळात फक्त दीडपट भाडे करण्याची मंजुरी देणेत आली होती तरी देखील खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट झाली. स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते नित्यानंद दळवी,विजय गांधी आदींनी याबाबत परिवहन खात्याला निवेदन दिले असून अशा खासगी प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com