गणेशमूर्ती कारखान्यात सुरू झाली लगबग
रत्नागिरी:गणपती उत्सव दोन दिवसांवर आल्याने गणेशमूर्ती तयार करणार्या विविध कारखान्यांमध्ये सध्या गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टी व पुरग्रस्त परिस्थितीमुळे गणेश कारखान्यांवर त्याचा परिणाम झाला होता. यामुळे मुर्तीकाम करण्यास उशीर झाला होता. मध्यंतरी पावसाने १० ते १५ दिवस उघडीप घेतल्याने मुर्तीकारांचे काम थोडे सोपे झाले. त्यामुळे आता गणेशमूर्ती वेळेवर देण्यासाठी त्यांची कसरत सुरू झाली आहे.
www.konkantoday.com