शाडूच्या मूर्तींना प्राधान्य द्या हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे नवे संशोधन झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने त्याविषयी परिपत्रक काढले आहे. यामुळे शासनाने शाडूमातीच्या नैसर्गिक रंगात केलेल्या मूर्तींना प्राधान्य द्यावे अशी मागणी रत्नागिरीतील हिंदूत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कागदी लगद्यात अनेक विषारी रसायने असून ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे यामुळे कागदी लगद्यापासून बनवलेल्या प्रदूषण होत आहे. यामुळे शाडूच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे या संघटनांनी केली आहे. या शिष्टमंडळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर, सुशील कदम, ऋषिकेश पाष्टे, हिंदूराष्ट्र सेनेचे रुपेश तावडे रत्नागिरी ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य जयंत आठले, श्रीराम नाखरेकर ,अरविंद बारस्कर ,प्रफुल्ला पोंक्षे ,संकेत पोंक्षे, चंद्रशेखर गुडेकर, निलेश नेने, पुरुषोत्तम वागळे,संजय जोशी यांचा सहभाग होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button