*कोकण व अन्य परिसरात पडत असलेल्या जमिनींच्या भेगांबाबत गांभीर्याने पाहणे गरजेचे:खा. सुनिल तटकरे
रत्नागिरी:अतिवृष्टीमुळे या वर्षी कोकणासह रायगड व अन्य भागात जमिनींना व रस्तांना मोठ्या प्रमाणावर भेगा पडण्याचे प्रकार घडले आहेत. एवढेच नव्हे तर डोंगर भागातही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले. अशा परिस्थितीमुळे अनेक गावात लोकांना राहणे कठीण झाले आहे. यासाठी केंद्राच्या भूगर्भ शास्त्रज्ञांचे पथक व या विषयातील तज्ञ मंडळींनी तातडीने येथे येवून याबाबत उपाययोजना करण्याचे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com